Sunday, April 10, 2011

तू फक्त सुखी राहा ....एवढेच मागेल मी ..

तुझ्यात किती सहज समरस झालो ..
तितक्याच सहजतेनं ठरवून दुरही झालो ..
पण तुझ्या आठवणी  ..कसा दूर जाऊ त्यांच्या पासून ..?

तुझेसोबात असताने कायम हसत राहिचो ..
पण.. आता हास्यच गायब झालाय चेहऱ्यावरचे ..
आणि कारण असून रडू सुद्धा येत नाही आजकाल मला .....!

पूर्वी तुझेसोबत चालताना किती चाललोय याचं भान नसायचं..
आज एकटा चालताना बघून ती वाटही हसते बघून माझेकड
म्हणूनच आजकाल तिला वाईट वाटू नये म्हणून
मी फिरणंच बंद केलंय त्या वाटेने ....!!

तू भेटणे अगोदर फुलांचा गंधहि नव्हता मला ..
पण तू दिलेला गुलाब सुकलाय पण तरीही जपून ठेवलाय ..
तुझ्या बाबतीत मी हेच तर केलंय ...!

तुझा हात कधी हातात येयील असा वाटलच नव्हतं..
आणि आलेवर लगेच सुटेल असा विचार पण केला नव्हता..
मला वाटतंय जगेन तुझेशिवाय ..पण मला वाटतंय तसा होतंय कुठे ?

तुला आठवतंय .. एकदा तू तुझा स्कार्फ विसरली होतीस ..
मी हि तो छान घडी करून  जपून ठेवला होता ..
पण आता तू मला विसरलीस
तेव्हा..स्वतःला तसं जपणं सुद्धा कठीण आहे ग मला .....!!

पण .. तू नकोस काळजी करूस माझी ...
जगेल मी कसाही ..एक भावनाशून्य दगड होऊन ..
तू फक्त सुखी राहा ....एवढेच मागेल मी ..
असेल काही माझे हातून चांगले घडले तर त्या ...दगडाच्या देवाजवळ ......!!
ज्याला कुठल्याच भावना नाहीत अश्या .. त्या दगडाजवळ .....!!

सनी ..एक वेडा मुलगा ....!!

No comments:

Post a Comment