Tuesday, February 15, 2011

माणसाने समुद्र होण्यापेक्षा व्हावे किनारा..........!!

माणसाने समुद्र होण्यापेक्षा व्हावे किनारा..........!!

लाटेसारखे  येणारे प्रत्येक दुखः घट्ट पाय रोऊन झेलणारा....

किनारयाला नसतातच कुणी मित्र वा वैरीही

त्याच्या नशीबात असतात फ़क्त लाटा अन....

दर लाटेसोबत मिळणारा नविन आघात ऊघडतो अनुभवाच्या नविन वाटा...

त्यातली एखादी लाट असते हळुवारपणे येणारी.....

अलगद्पणे किनरयाला त्याची व्यथा विचारणारी..

पण त्या लाटेत गुंतायचे नसते किनारयाने

कारण क्षणात  त्याची स्वप्ने भंगतात  एका नविन आघाताने...

म्हणुनच म्हणतो समुद्र होण्यापेक्षा  व्हावे किनारा

शेवटी तोच असतो सोबती दु:ख प्रत्येक लाटेचे सामाऊन घेणारा...........!!


 सनी ....

No comments:

Post a Comment