Sunday, February 27, 2011

कधी केला का प्रश्न या अन्यायाचा ..........??


आयुष्य सरत चाललंय .
ओल्या जखमा घेऊन ..
तीच अपमानाची दलदल
अन बदल्याची भावना घेऊन ...

तुझ्याच हातात आहे
स्वतःच्या अभिमानाचा लगाम
सुखलेल्या खपल्या
उकरणं किवा पुन्हा फुंकर घालून
सुकावणं  ...
तुझ्याच हातात आहे ......

अपमान चिघळत बसणं
नेहमीच कठीण जातं..
तो गिळून टाकावा
आणि सोडावा श्वास ...
निरागसतेचा ...

मी खरं सांगू ...
तुझं माझं काही जात नाही ..
इथे हरवतात ते फक्त क्षण
मला हवा असतो तुझा प्रेमळ सहवास
आणि सोबत ...तू सुद्धा ..

पण तुझ्यात असते ओढ
बदल्याची...
दिवस -रात्र  वेळ तुझ्या
खटल्यांची ...

कंटाळा आलाय आता मला
तुझ्या अस्तित्वाच्या धड्यांचा ..
मी शून्य होवून जगलोच ना ..
कधी केला का प्रश्न या अन्यायाचा ...??

मी स्वीकारत आलोय तुला ...
तुझ्या अहंकारा सहित ..
पण आज कळतंय ..
सर्व व्यर्थ जातंय ...
हाती काही नाही .......!!!

No comments:

Post a Comment