वाट पाहताना , मन म्हणाले
जरा दोर घट्ट आवळ
सख्य नसले तरी
तुझ्या वेड्या प्रेमाला आवर.....
पण तू दिसताच सैरभैर झाले हे मन
तू तर निघून गेलीस ..
सांग आता कशी करू सावरा सावर ...
तुझ्या सोबतचे ते क्षण काही औरच होते ..
कारण ते सुंदर पेक्षा सुंदर होते
तू गेल्यावर स्वतःलाच विचारले ..
माझे एवढे काय चुकले होते ..
पण तरीही मनाला समाधान आहे
कारण माझे प्रेम खरे होते ....
दिलेल्या सुखापेक्षा गणती तू केली ती दु:खाचीच
अर्ध्यावरती तू सोडलस ...
तेव्हा सांग चूक होती कुणाची ..?
मानले चूक तुझी ना माझी ...
पण पळवाट म्हणून कि काय ..
दोष शेवटी परिस्थितीच्या माथी ...
काहीच न झाल्या सारखे बोलयाचे ..
ते माझे शर्थीचे प्रयत्न होते ..
तुला काय माहित ..
त्यात माझ्या मनाची किती फरफट होते ...
तुला अधांतरी सोडण्याचे धाडस केले होते ...
पण माझे मन माझ्यावरती किती रुसून बसले होते .......!!
सनी ..एक वेडा मुलगा..!!
No comments:
Post a Comment